तालुक्यातील शेतकरी बांधवांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असुन मोठ्या मुश्किलीने उपजिवीका चालवत आहे. त्यात महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी सक्तिच्या वसुली साठी ग्रामीण भागातील डी.पी सक्तिने बंद करत आहे तसेच ग्रामीण भागात 18 तास लोड शेडिंग नावाखाली विज खंडीत करत आहे व त्यामुळे पिकांना पाणी भरणा करण्याचे दिवस असुन त्यामुळे पिकांचे पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विज कंपनीला शेतकरी बांधवांना विज सुरळीत उपलब्ध करून देणेबाबत तसेच डी पी बंद करु नये असे आदेश देण्यात यावे अशा आशयाचे तहसीलदारांना निवेदन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मनमाड शहराच्या वतीने देण्यात आले यावेळी शहरअध्यक्ष दिपक गोगड, सेवादल जिल्हाअध्यक्ष राजेंद्र जाधव, अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष हबीब शेख,मा नगरअध्यक्ष प्रकाश बोधक,जिल्हा संघटक अमोल गांगुर्डे, शहर उपाध्यक्ष संदीप पाटील,श्रीराज कातकडे,अक्षय देशमुख इ उपस्थित होते.













