loader image
[ays_poll id=7]

नांदगाव मनमाड सह राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका औरंगाबाद हायकोर्टाच्या आदेशाने रद्द

Dec 1, 2022


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

याबाबत अधिक वृत असे की राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होणार होत्या . त्यासाठी अधिसुचना जारी होवून निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला होता . पंरतू श्रीरामपूर येथील दिपक पटारे यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचीका दाखल केलेली होती . या याचीके वर निर्णय देतानां जाहीर झालेल्या निवडणुका रद्द करून नव्याने १५ मार्च नंतर निवडणूका घेण्याचा आदेश दिल्याने गाव पातळी वरील पुढारी वर्गाचा हिरमोड झाला असून आता शेतकरी वर्गाला सुद्धा निवडणूका लढवता येणार असल्याने सर्व सामान्य शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे .
नांदगाव बाजार समितीच्या व्यापारी गट/ सोसायटीगट / ग्रामपंचायत गटातील मतदान यादीत चुका असल्याने मोठया प्रमाणावर हरकती दाखल झालेल्या होत्या . आता निवडणूका रद्द झाल्याने मार्च महिन्यात पुन्हा नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने पुन्हा नवीन यादया तयार कराव्या लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

.