मनमाड – मनमाड नगरपालिका प्रवेश द्वाराजवळ आज सकाळी ११ वाजता नगरपालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी रिपाई तर्फे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसापासून समस्त मनमाड करांची इच्छा आहे कि, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा बसविण्यात यावा. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या महापुरुषांचा वापर मत घेण्यासाठी होत आहे. तरी आपण लोक भावनेचा आदर करून त्वरित दोन्ही महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे १४ एप्रिल पर्यंत बसविण्यात यावे. अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन नगरपालिका प्रशासन यांना देण्यात आले यावेळी दिनकर धिवर, दिलीप नरवडे, कैलास अहिरे, गुरु कुमार निकाळे, ऍड प्रमोद अहिरे,व रिपाई पदाधिकारी उपस्थित होते.













