गाझियाबादच्या मसुरी पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रेल्वेची धडक बसून ३ जणांचा मृत्यू झाला,यामध्ये दोन मुले आणि एका मुलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. मृत तिघांची ओळख पटली आहे. डीसीपी ग्रामीण झोन डॉ. इराज राजा यांनी सांगितले की, कल्लू गढी रेल्वे ट्रॅकवर एक तरुणी आणि दोन युवक रील बनवत असल्याची माहिती स्टेशन मास्टरकडून मिळाली होती. त्यानंतर भरधाव वेगात येणाऱ्या पद्मावत एक्स्प्रेस गाडीने धडक दिल्याने तिघांचाही मृत्यू झाला.
मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू
मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...







