सातपूर (प्रतिनिधी) :- येथील अशोक नगर परिसरातील अनेक ठिकाणी अचानक तिन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महावितरणाच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, महावितरणाने विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी नागरिकांसह केली आहे.
सातपूर व अशोक नगर परिसरातील सावरकरनगर, बळवंतनगर, जाधव संकुल, वास्तूनगर, विश्वासनगर, राज्य कर्मचारी वसाहत आदी भागांत काही दिवसांपासून अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या आहे.
प्रकाराच्या वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, पावसाळ्यात पाऊस येण्याच्या आधीच लाईट बंद केली जाते. समोरच्या परिसरात लाईट असते म्हणजे सातपूर कॉलनीत लाईट असते व सावरकरनगर या भागात लाईट नसते. अनेक नागरिकांना याचे कारणही माहीत नसते. लाईट गेल्यावर महावितरण विभागाला फोन केला, तर त्यांचे ठरलेले उत्तर असते, की रिपेअरिंगचे काम चालू आहे. तीन-चार तासांत लाईट येईल. रिपेअरिंगच्या नावाखाली किती दिवस वीजपुरवठा खंडित करणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. महावितरण विभागाने नागरिकांची समस्या त्वरित दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली












