loader image
[ays_poll id=7]

अशोक नगर परिसरातील विज पुरवठा सुरळीत करण्याची रवींद्र देवरे यांची मागणी

Dec 17, 2022


सातपूर (प्रतिनिधी) :- येथील अशोक नगर परिसरातील अनेक ठिकाणी अचानक तिन ते चार तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. महावितरणाच्या या भोंगळ कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, महावितरणाने विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी नागरिकांसह केली आहे.

सातपूर व अशोक नगर परिसरातील सावरकरनगर, बळवंतनगर, जाधव संकुल, वास्तूनगर, विश्वासनगर, राज्य कर्मचारी वसाहत आदी भागांत काही दिवसांपासून अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या आहे.

प्रकाराच्या वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, पावसाळ्यात पाऊस येण्याच्या आधीच लाईट बंद केली जाते. समोरच्या परिसरात लाईट असते म्हणजे सातपूर कॉलनीत लाईट असते व सावरकरनगर या भागात लाईट नसते. अनेक नागरिकांना याचे कारणही माहीत नसते. लाईट गेल्यावर महावितरण विभागाला फोन केला, तर त्यांचे ठरलेले उत्तर असते, की रिपेअरिंगचे काम चालू आहे. तीन-चार तासांत लाईट येईल. रिपेअरिंगच्या नावाखाली किती दिवस वीजपुरवठा खंडित करणार, असा सवाल नागरिक करीत आहेत. महावितरण विभागाने नागरिकांची समस्या त्वरित दूर करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी केली


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.