loader image
[ays_poll id=7]

जळगावात निवडणूक निकालानंतर दोन्ही गट आमने सामने – भाजपच्या कार्यकर्त्याचा मृत्यू

Dec 20, 2022


ग्रामपंचायत निवडणूक निकालाचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. निवडणूक निकालानंतर दोन गट आमने-सामने आले. दोन्ही गटातील कार्यकर्ते परस्परांत भिडले. यावेळी दोन समुहांकडून दगडफेक देखील करण्यात आली. या प्रकारात एक भाजपचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. दुर्दैवाने यात त्याचा मृत्यू झाला आहे.

 

 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात शाब्दिक वाद झाले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यातील भाजपचा धनराज माळी नावाचा २५ वर्षीय कार्यकर्ता गंभीर जखमी झाला.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.