नांदगाव सोमनाथ घोंगाणे
झारखंड राज्यातील सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र हे सर्व जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र तीर्थक्षेत्राशी जगातील प्रत्येक जैन धर्मीय व्यक्तीच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. कोणत्याही समाजाचे आदरस्थान सुरक्षित राहील ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. पर्यटन क्षेत्र घोषित केल्यास त्या ठिकाणी दारू, मांसाहार उपलब्ध होतील व अनैतिक घटना घडून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट होईल.
केवळ उत्पन्नाचे साधन म्हणून झारखंड सरकार तेथे पर्यटक यावेत म्हणुन निसर्गप्रेमी तसेच भक्तांच्या भावनांचा विचार न करता काम करणार असेल तर ते आमच्या आस्थेविरूद्ध असल्या मुळे आज नांदगाव शहरातून समस्त जैन समाजाने शांततामय मार्गाने निषेध फेरी काढून प्रशासनास निवेदन देण्यात आले .
निवेदन देण्यासाठी खं .दि .जैन पचांयतचे अध्यक्ष सुशिल कासलीवाल विश्वस्त नुतन कासलीवाल राजेश बडजाते
उपाध्यक्ष कैलास कासलीवाल उप महामंत्री सुमेर कासलीवाल दत्तराज छाजेड’ विजय चोपडा ‘महावीर पारख’ सजंय लोहाडे ‘चंचल गंगवाल’ पियुष काला’ दिपक कासलीवाल ‘ आनंद कासलीवाल ‘ समीर कासलीवाल ‘ सचीन पारख ‘डॉ. आनंद पारख ‘ संजीव कासलीवाल ‘ आनंद चोरडीया ‘ सोमनाथ घोंगाणे ‘ मनोज वाघ ‘ कान्हा कलंत्री ‘ जैन समाजासह इतरही समाजाचे नागरीक व कार्यकर्ते उपस्थीत होते.














