loader image
[ays_poll id=7]

“निर्लज्जपणा” शब्द वापरणे भोवले – राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित

Dec 22, 2022


सध्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विरोधकांमध्ये खडाजंगी होत असून बोलू दिले जात नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करू नका, असे म्हणत राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी आधिवेशन संपेपर्यत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जयंत पाटील यांनी असा निर्लज्जपणा करू नका, असे वक्तव्य केले.
त्यानंतर जयंत पाटील यांच्या विधानामुळे सत्ताधारी भाजपचे आमदार आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी सभागृहामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात असं वक्तव्य कुणी करू नये, यासाठी कारवाई करावी अशी मागणी केली.

त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या विधानाबद्दल प्रस्ताव मांडला. त्यावर विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी ठराव बहुमताने मंजूर केला. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. उद्यापासून अधिवेशन संपेपर्यंत अधिवेशनामध्ये येता येणार नाही.


अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

बघा व्हिडिओ-सिद्धी क्लासेस कॅम्पस मध्ये कर्क रोग जागृती – झुंबा डान्स ने आगळा वेगळा ठरला हळदी कुंकू समारंभ

मनमाड - येथील सिध्दी क्लासेस नेहमीच विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रम पूर्ण करण्याबरोबरच...

read more
येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
.