मनमाड – दिनांक ३१ डिसेंबर रोजी गडकिल्ल्यांवर मद्यपान, नशापाणी, मांसाहारी पार्ट्या करून गडकिल्ले व परिसरातील वास्तु, स्मारके यांचे पावित्र्य भंग करणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यात यावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान नाशिक विभागातर्फे नितीन शेळके यांनी मनमाड पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले.
महाराष्ट्रातील तमाम गडकिल्ले हे शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेतील बलस्थाने असून यासाठी अनेक मावळ्यांनी आपले बलिदान दिले आहे. ह्या किल्ल्यांवर अनेक समाध्या आणि देवी देवतांची मंदिरे असल्याने आम्ही हिंदुस्थानातील शिवभक्त गडप्रेमी त्यांना पवित्र तीर्थस्थाने मानतो. दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी पाश्चिमात्यिक संस्कृतीचे अनुकरण करणारे काही ठराविक लोक, समूह ह्या किल्ल्यांवर मद्यपान पार्ट्या करून धिंगाणा घालण्याचे दुष्कर्म करत असतात. यामुळे तेथील पावित्र्य भंग होते. आणि बऱ्याच प्रमाणात कचराही जमा होतो. त्यामुळे अशा घटना घडू नये यासाठी ३१ डिसेंबर रोजी आपल्या जवळील किल्ल्यांवर पोलिसांची गस्त ठेवावी अशी सह्याद्री प्रतिष्ठान च्या दुर्गसेवकांची मागणी असल्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान चे नाशिक जिल्हा संघटक नितीन शेळके, प्रवीण शेळके तसेच मनमाड पोलिस स्टेशन चे अधिकारी भाऊसाहेब कोते, सुनिल पवार हे उपस्थित होते.
मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त
मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...






