मनमाड :- जालना मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस या गाडीच्या आरक्षित बोगी ची कपलिंग तुटल्याची घटना गुरुवारी सकाळी मनमाड जंक्शन स्थानकावर घडली. गाडी मनमाड स्थानकावर असतानाच सर्व प्रकार घडला वेळीच हा सर्व प्रकार लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला मात्र या सगळ्या धावपळीत जनशताब्दी एक्सप्रेस ला सव्वा दोन तास उशीर झाला यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला
याबाबत सविस्तर माहिती अशी की जालन्यावरून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्थानकावर आपल्या नियोजित वेळेवर आली त्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना होत असताना गाडीच्या आरक्षित बोगी क्रमांक डी इलेव्हन बोगीच्या कपलिंग बेरिंग खराब झाल्यामुळे गाडी काही बोगी सोडून थोड्या अंतरावर गेली

मात्र हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली मात्र हाच प्रकार चालू गाडीत झाला असता तर मोठा अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती दैव बलतवर म्हणून सदर घटना टळली रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर कार्य हातात घेत या गाडीची खराब झालेली डी इलेव्हन हे बोगी कट करून त्या जागी दुसरी बोगी लावण्यात आली यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली या सगळ्या गडबडीत मात्र जालन्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला गाडी तब्बल सव्वा दोन तास उशिराने मुंबईच्या दिशेने रवाना झाली













