loader image
[ays_poll id=7]

टाटा मॅजिक जळून खाक; अंकाई जवळील घटना

Dec 30, 2022


मनमाड रेल्वे स्थानकांतून शिर्डीसाठी ७ ते ८ प्रवासी घेऊन टाटा मॅजिक ही प्रवासी वाहतूक करणारी गाडी मनमाडकडून शिर्डीकडे भरधाव निघाली होती. मनमाडहुन गाडी निघाली असता मनमाड येवला रस्त्यावर अंकाई फाट्याजवळ रस्त्याने जात असताना गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. गाडीत काही तरी बिघाड झाला असावा किंवा गाडी जास्तच गरम झाली असावी त्यामुळे गाडी पेट घेऊ शकते हे लक्षात आले असतात चालकाने प्रसंगावधान दाखवत अंकाई फाट्याजवळ गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून उभी करत गाडीत बसलेले सर्व प्रवासी तातडीने उतरवून देऊ त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. चालकाने गाडीखाली उतरून पाहणी करीत असताना इंजिनमध्ये आग लागली. पाहता पाहता गाडीने चांगलाच पेट घेतला होता. गाडी पेटल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी आणि वाहतूक कोंडी देखील झाली होती. या घटनेमुळे रस्त्यावर काही काळासाठी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गाडी चालकाच्या प्रसंगावधानामुळे जीवितहानी टळली असली तरी या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले आहे. आगीची तीव्रता एवढी होती की, अवघ्या काही मिनिटांत गाडी पूर्ण जळाली. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेशमधील असल्याचे सांगण्यात येते. धावत्या गाडीने अचानक कसा पेट घेतला. याचे निश्चित कारण समजू शकले नाही. आगीची माहिती मिळताच मनमाड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेतली. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. हे सर्व प्रवासी उत्तर प्रदेश येथून रेल्वेने मनमाडला आले व मनमाड येथून शिर्डी येथे खाजगी वाहनाने जात असतांना ही दुर्घटना घडली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.