मनमाड :- दुपारच्या वेळी नांदगाव ते भालूर या मार्गावर बस वाहतूक सुरू करावी अशी मागणी करणारे निवेदन नांदगाव तालुका युवा सेनेतर्फे नांदगाव आगार व्यवस्थापक यांना देण्यात आले.
युवा सेना तालुकाप्रमुख सनी फसाटे, नांदगाव तालुकाप्रमुख संतोष गुप्ता, आशिष घुगे, पवन पवार, सौरभ निकम, आदेश शिंदे, अविनाश शिंदे, आदित्य आहेर, प्रगती निकम, प्राजक्ता चोळके, पूजा निकम, रोहिणी चोळके, विशाल शेळके, साहिल सोमासे, अविष्कार देवकर, भूषण आहेर, ओमकार मोरे, केतन मोहिते,
अजिंक्य धनगे, प्रवीण निकम, रोशन लाड, सिद्धांत चोळके आदींच्या या निवेदनावर स्वाक्षरी
दुपारी १.४५ मिनिटांची नांदगाव ते भालूर व तीन वाजून ४५ मिनिटांची भालूर मार्गे नांदगाव ते मांडवड ही बस सेवा सुरू होती पण रस्त्याचे काम सुरू असल्याकारणाने सदर सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सकाळी सहा व आठ वाजता वाजेची भालूर ते नांदगाव बस नियमित सुरू झालेली आहे. मात्र दुपारची नांदगाव ते भालूसाठी एकही बस अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे नांदगाव ते भालूर मार्गावरील महाविद्यालय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे ६०% विद्यार्थी कॉलेज आणि शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याबाबत विद्याथ्र्यांनी प्रशासनाला निवेदन दिलेले आहे. मात्र परिवहन विभागाकडून दखल घेण्यात आलेली नाही. सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी निवेदनाची दखल घेऊन बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी निवेदनात केली आहे.















