मनमाड शहरात भारतीय खाद्य निगम,अन्न महामंडळाचे आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे गोदाम असून येथून राज्यातील इतर भागात गहू, तांदूळ धान्य सरकारी धान्य दुकानात पाठवले जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेक सरकारी दुकानांमध्ये धान्य पोहचत नसल्याची तक्रार आल्याने केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी एफसीआय मध्ये पाहणी दौरा करत पाहणी केली. एफसीआयच्या प्रबंधक असलेल्या मनीषा मीना यांना एफसीआय मध्ये असलेल्या गहू, तांदळाचा प्रत्येक महिन्याचा किती साठा उपलब्ध आहे किती वितरण केले गेले यासह इतर माहिती विचारली असता मीना यांना माहिती देता आली नसल्याने मंत्री डॉ पवार यांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. जानेवारी ते डिसेंबरचा साठा, पुरवठा किती. वाटप कसे केले जाते याबाबत विचारले असता अधिकाऱ्यांना कोणतेच समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच धान्य मोजले जाणारा वजनकाटा बंद आहे. एकच काट्यावर काम सुरू असल्याचे दिसून आले. येथून रोज शंभर ट्रक धान्य भरून पाठवले जात आहे. तसेच एफसीआय मध्ये असलेल्या गोदामाची पाहणी केली असता अस्वच्छता दिसून आल्याने मंत्री डॉ पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे शहराध्यक्ष जय फुलवाणी, जिल्हा उपाध्यक्ष पंकज खताळ, डॉ सागर कोल्हे, संदीप नरवडे, एकनाथ बोडके, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर धिवर, कैलास अहिरे, बाळासाहेबांचे शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष मयूर बोरसे यासह इतर पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच एफसीआयचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी एफ सी आय मध्ये कार्यरत असलेल्या विविध कामगार संघटनांनी कामगारांच्या समस्येबाबत मंत्री डॉ पवार यांना निवेदन देत आपले गाऱ्हाणे मांडले.
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न
मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा मराठी भाषा गौरव दिनी...











