शनिवारी भूमी क्रिकेट अकॅडमी मनमाड विरुध्द चाळीसगाव क्रिकेट अकॅडमी या संघामध्ये झालेल्या सामन्यात भूमी क्रिकेट अकॅडमी संघाने 21 धावांनी विजय प्राप्त केला. 30 षटकांच्या या सामन्यामध्ये चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचे ठरवले. मनमाड संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 10 बळी गमवुन 118 धावा केल्या. यात सर्वाधिक धावा कैलास सोनवणे या डावखुऱ्या फलंदाजाने 18 चेंडूत 29 धावा फटकावल्या. खुशाल परळकर 66 चेंडुमध्ये 22 महत्वपुर्ण धावा संघासाठी जमवल्या. या धावांचा पाठलाग करत असताना चाळिसगाव संघ 19.1 षटकात सर्वबाद 97 धावाच करु शकला. फलंदाजीत 29 धावा 6 षटकांच्या गोलंदाजीत 34 धावा देऊन 03 बळी टिपणारा कैलास सोनवणे हा सामनावीर ठरला तसेच 5 षटकात 24 धावा देऊन 3 बळी टिपणारा रूषी शर्मा सर्वोत्कृष्ठ गोलंदाज ठरला. भुमी संघातील यशवर्धन बरवट व अध्ययन चव्हाण ह्या खेळाडुंनीही प्रत्येकी 2 बळी घेतले.
भूमी क्रिकेट अकॅडमी, मनमाड चे संचालक व कोच सिध्दार्थ ( भोला ) रोकडे व वाल्मिक रोकडे यांनी या सामन्याचे आयोजन चाळीसगाव येथे केले.
अकॅडमीचे चे मार्गदर्शक श्री. ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , हबीब शेख , सिद्धार्थ बरडीया , परवेज शेख , कौशल शर्मा , तय्यब शेख , शुभम ( बापु ) गायकवाड , शुभम बिडगर रोहित पवार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान भाई मोमीन यांनी खेळाडुंना पुढिल सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या.












