मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील ह्या कार्यक्रमालाउपस्थित होते. राज ठाकरे यांनी अशोक सराफ यांचे कौतूक केले करतांना ते म्हणाले की अशोक सराफ दक्षिण भारतात असते, तर आज ते मुख्यमंत्री असते.
“अशोक सराफ यांनी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिका अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. अशोक सराफ हे दक्षिणेत असते तर मुख्यमंत्री असते. ४०-४० फूट उंचीचे त्यांचे कटआऊट लावले असते. आपल्याकडे महाराष्ट्रात तसे काहीही नाही. कलावंत आहे का. मग ठीक आहे, एवढे बोलून आपल्याकडे विषय संपवला जातो. कलावंतांचं महत्त्व परदेशी गेल्यावर समजत नाही,” असे राज ठाकरे म्हणाले.
“परदेशात कलावंतांच्या नावाने विमानतळे असतात. आपल्याकडे कलावंतांच्या नावाने चौक असतात. आपल्याकडे प्रतिमा जेवढी जपली जाते तेवढी प्रतिभा जपली जात नाही. मी अशोक सराफ यांचा कलावंत म्हणून नेहमीच आदर करत आलो. इतकी वर्षं लोकांना भूरळ घालणं तसेच सतत वेगवेगळे प्रयोग करत राहणे सोपी आणि साधी गोष्ट नाही. अशोक सराफ युरोपात असते तर त्यांच्या स्वागतासाठी आज मंचावर पंतप्रधान असते,” असे गौरवोद्गार राज ठाकरे यांनी काढले.
इको गाडी आणि दुचाकीचा अपघात – मनमाड च्या दोन तरुणांचा अपघाती मृत्यू
मनमाड - मनमाड लासलगाव रोडवर रायपूर गावानजीक खंडेराव मंदिराजवळ दुचाकी व इको गाडीचा समोरासमोर धडक...











