loader image
[ays_poll id=7]

स्वराज्य निर्मितीच्या जिजाऊ प्रेरणास्रोत – प्रा.डॉ.अरुण पाटील

Jan 12, 2023


मनमाड – दि.१२
राजमाता जिजाऊ यांच्या कार्याकडे जर बघितले तर राजे शिवछत्रपती यांच्या स्वराज्य निर्मितीसाठी जिजाऊ एक मुख्य प्रेरणास्त्रोत होता, एक स्त्री असूनही चार भिंतींच्या कुटुंबापलीकडे जाऊन अखंड स्वराज्य संस्थापणेची स्वप्न त्यांनी शिवबा जन्माला येण्याअगोदरच पाहिली होती, पुढील काळात शिव छत्रपतीनी ती पूर्ण केली, आणि महाराष्ट्रमुघलांच्या जुलमी सत्तेतून मुक्त झाला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अरुण पाटील यांनी केले.
महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित कला,वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय मनमाड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी या दोन्ही महान विभूतींना अभिवादन करताना प्राचार्य डॉ.पाटील बोलत होते. यावेळी उप प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, कुलसचिव समाधान केदारे, आदी उपस्थित होते.पाटील पुढे म्हणाले की, मोठी माणसे ही जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर मोठीच असतात. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनाकडे बघताना त्यांच्याकडून अनेक प्रेरणा आपल्याला मिळतात. त्यांच्या अनेक पुस्तकांचा दाखला यावेळी डॉ. पाटील यांनी दिला.महापुरुष हे केवळ एका काळाचे प्रतिनिधित्व करत नसतात तर कोणत्याही काळासोबत त्यांचे विचार प्रेरणादायी ठरतात, असे सांगून त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्य कर्तृत्ववावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ढमाले यांनी केले. प्राचार्य डॉ.पाटील यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
.