loader image
[ays_poll id=7]

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कर्ज वसूली विरोधात पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थाना समोर बिऱ्हाड आंदोलन

Jan 12, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कर्ज वसुली विरोधात पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६ जानेवारी रोजी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वसुली चा धडाका लावला आहे.जमिनीचा लिलाव काढण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामूळे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन लढा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली १६तारखेला पालकमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी बिऱ्हाड आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटने तर्फे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शासकीय विश्राम गृह नांदगाव येथे बैठक पार पडली. या आंदोलनासाठी आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस ,युवा काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
या बैठकीसाठी शेतकरी बचाव समन्वयक बापुसाहेब महाले व निवृत्ती पगारे जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना, परशराम शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष, शेतकरी संघटना, व भोजराज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, यावेळी परशराम शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ता, अध्यक्ष निलेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले, तसेच बापुसाहेब महाले व गारे पाटिल, शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांची भाषणे झाली, यावेळी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाअध्यक्ष विजय पाटील चव्हाण, सोपान पवार, आम आदमी पक्षाचे विशाल वडघुले, शेतकरी संघटनेचे ता .अध्यक्ष मच्छिंद्र वाघ, निव्रूती दादा खालकर, विठ्ठल दादा आहेर, रमेश बागुल, सुदान काळे, शिवाजी जाधव, राकेश चव्हाण, मधुकर बोरसे, वसंतराव मोरे सुभाष चव्हाण, अरूण पवार, देविदास देवरे अक्षय सरोदे, सोमनाथ शिंदे आदि शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

 

प्रतिक्रिया
निलेश चव्हाण
स्वाभिमानी शेतकरी संघटना

जिल्हा बँकेने सुरू केली सक्तीची वसुली बेकायदेशीर असून ती तात्काळ थांबून राष्ट्रीयकृत बँकेप्रमाणे जिल्हा बँकेला ओटीएस कायद्यात सहभागी करावी व नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे मत निलेश चव्हाण यांनी मांडले


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.