महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत शिंगवे येथे विशेष श्रमसंस्कार शिबिरात दरेगाव चे पोलीस पाटील व प्रगतिशील शेतकरी सोमनाथ गांगुर्डे यांचे वातावरण बदलावरील व्याख्यान संपन्न झाले.
प्रत्यक्ष अनुभवातून स्वतः लिहिलेली दोन पुस्तकांचे अनुभव त्यांनी ग्रामस्थांसमोर व रा से यो स्वयंसेवकांसमोर मांडली. या पृथ्वीतलावर जीवसृष्टी ही वातावरणाचे रक्षण करत असते परंतु क्रूर झालेला मानव त्या जीवसृष्टीलाच नष्ट करायला चाललेला आहे त्यामुळे वातावरणामध्ये अनेक बदल घडत आहेत हे त्यांनी अनेक उदाहरणांद्वारे पटवून सांगितले. या व्याख्यानाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी, डॉ. गणेश गांगुर्डे व प्रा वर्षाराणी पेडेकर यांनी केले.













