दहेगाव शिवारात असलेल्या मनमाड नगर परिषदेच्या कचरा डेपोला तीन दिवसांपूर्वी आग लागल्याची घटना घडली होती. या आगीमुळे दहेगावसह परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला. कचऱ्याला आग लागली कशी काय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत असून, गेल्या पाच ते सहा वर्षांत जवळपास बारा ते पंधरा वेळेस आग लागली आहे.याबाबत रिपब्लिकन पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मनमाड शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील रोज जमा होणारे घनकचऱ्याचे विघटन करून त्यातून ओला कचरा व सुका कचरा वेगळा करून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी पालिकेच्या दहेगावातील डम्पिंग ग्राउंडवर कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
“सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प” ठरतोय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे साधन
शेतीसाठी वाढता खर्च उत्पन्नाची शाश्वती नसणे बाजारभावाची हमी नसणे गारपीट यासारख्या अनेक प्रकारच्या...











