loader image
[ays_poll id=7]

पोलिसांच्या जाचाला कंटाळून सराफ व्यावसायिकाची आत्महत्या

Jan 29, 2023


नाशिक रोड : येथील सराफ व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चोरीचे सोने घेतल्याचा आरोप पोलिसांनी या सराफावर केला होता. या घटनने परिसरात खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे.
येथील रहिवासी असलेले सराफ व्यवसायिक दीपक कमलाकर दुसाने यांचे परिसरातील देवी चौकात दुसाने बंधु नावाने दुकान आहे. उल्हासनगर येथील पोलिसांनी वारंवार चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करत त्रास दिल्याने त्यांनी राहत्या घरी आत्महत्या केली अशी माहिती मृत दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

कालिदास दुसाने यांनी माध्यमांना सांगितले कि, २३ तारखेला दीपक यांच्या दुकानात ठाणे येथून पोलिस आले व त्यांनी दीपक यांच्यावर चोरीचे सोने घेतल्याचा आरोप केला. व त्याची भरपाई म्हणून २ लाख ९० हजार रोख तर १२ ग्रॅम सोन्याची मागणी केली. मात्र हे पैसे त्यांनी दुकानात न घेता परिसरातील बिटको पॉईंट येथे घेतले व कुठल्याही प्रकारचे लेखी कागदपत्र दिले नाहीत. त्यांच्या या जाचाला कंटाळून माझ्या पुतण्याने आत्महत्या केली. त्यामुळे संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दीपक दुसाने यांचे काका कालिदास दुसाने यांनी केली आहे.
या घटनेचे वृत्त समजात त्यांचे नातेवाईक, मित्र व सराफी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बिटको हॉस्पिटल येथे धाव घेतली. शवविच्छेदनानंतर आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला. उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश माईनकर, नाशिक रोड पोलिस ठाण्यातील गुन्हे शाखेच्या योगेश पाटील घटनास्थळी धाव घेत उपस्थितांची समजुत काढत मृतदेह ताब्यात घेण्याची विनंती केली.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.