loader image
[ays_poll id=7]

दहावी बारावीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोहचावे लागणार

Feb 2, 2023


­ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून २१ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ दरम्यान, दहावी व बारावी लेखी परीक्षा (SSC-HSC Exam) घेतल्या जाणार आहेत. परंतु, त्याआधी बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

 

या निर्णयानुसार उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात येऊ नये असे आदेश केंद्रांना देण्यात आलेले आहेत. यापूर्वी एखाद्या परिस्थितीत दहा मिनिटे उशीर झाल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जात होता. परंतु, आता उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येईल, असे आदेश बोर्डाने परीक्षा केंद्रांना दिले आहेत.

या निर्णयामुळे परीक्षा केंद्रांवर उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपरला मुकावे लागू शकते. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चदरम्यान घेण्यात येणारी दहावी-बारावीच्या परीक्षा सकाळच्या सत्रात 11 वाजता तर दुपारी 3 वाजता होणार आहे.परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांनी सकाळी साडे दहा तर दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे. या संदर्भातील पत्रकदेखील मंडळाकडून सर्व शाळांना देण्यात आले आहेत.

उशीरा येण्याच्या सवलतीचा फायदा घेऊन लेखी परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेतील आशय असल्याचे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.