loader image
[ays_poll id=7]

महाराष्ट्रातील सध्याचे सरकार हे घटनाबाह्य सरकार आदित्य ठाकरे

Feb 8, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे
महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजरात ला जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.
असल्याचा आरोप शिवसेनानेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला.

शिवसंवाद यात्रा निमित्ताने नांदगाव येथील जैन धर्म शाळेत आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते..

यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,अद्वय हिरे .जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..
शिवसेना नेते व माजी मंत्री  आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितले की, सरकार हे घटनाबाह्य सरकार असुन येत्या दोन तीन महिन्यात कोसळणार आहे .  आमच्या राज्यातून सहा उद्योग बाहेर गेले आहे. राज्याचे जी एस टी चे पैसे का मिळत नाही?  मुख्यमंत्री दिल्लीला स्वतःसाठी जातात त्यांना स्वतःचे काय होईल याची चिंता आहे.   राज्यासाठी केंद्राकडून काहीच आणत नाही. हे मुख्यमंत्री आपले आहे की गुजरातचे आहे हेच कळत नाही  कारण सर्वच प्रकल्प गुजराल जात आहे. यामुळे राज्यातील एक लाख तरुणांच्या नोकऱ्या बाहेर गेल्या आहेत.तसेच आज मी राज्यात जिथे फिरत आहे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन जनता आम्हाला प्रतिसाद देत आहे. मात्र गद्दार जिथे जातात तिथे जनता त्यांना उभे करत नाही. आजच्या सभेला महिलासुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहे. अशी परिस्थिती संपूर्ण राज्यात दिसून येत आहे . शिवसेना एकच असून एकच राहणार आहे. संपूर्ण राज्य महाविकास आघाडीसोबत उभे आहे. ज्यांनी गद्दारी केली ते जनतेला पटलेले नाही. अडीच वर्षे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी जनतेची जी सेवा केली, त्यामुळे देशभरात महाराष्ट्राचे नाव अग्रस्थानी राहिले. खोकेवाल्यांच्या सभा बघा व आमच्या सभा बघा. आमच्या सभेला जनता स्वतःहून येते व आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे सांगतात.. पारंपरिक मतदार शिवसेनेसोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. 
यावेळी अल्ताफ खान, अव्दय हिरे
गणेश धात्रक यांनी मनोगत व्यक्त केले..
यावेळीआमदार नरेंद्र दराडे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक,जयंत दिंडे, अल्ताफ खान, शिवसेना तालुका संतोष गुप्ता, पिंटू नाईक, संतोष बळीद शशिकांत मोरे, शहराध्यक्ष श्रावण आढाव आदी मान्यवर उपस्थित होते..


अजून बातम्या वाचा..

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, ‘शिक्षक दिन ‘,’श्री चक्रधर स्वामी अवतार दिन’ तसेच ‘मदर तेरेसा स्मृतिदिन’ संपन्न

मनमाड -येथिल सेंट झेवियर हायस्कूल मध्ये, 'शिक्षक दिन ','श्री चक्रधर स्वामी अवतार दिन' तसेच 'मदर...

read more
.