loader image
[ays_poll id=7]

कोळसा-शेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला – विकास वाहुळ

Feb 9, 2023


डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पत्र अभिवाचनाने रमाईस मुक्तीभूमी वाचनालयात अनोखे अभिवादन

येवला (प्रतिनिधी)
बाल वयापासून रमाबाईंच्या आयुष्यात दुःख,यातना,हल-अपेष्टा, उपासमार,आर्थिक अडचणी पुढे भीमराव आंबेडकरांच्या सोबतच्या सहजीवनात कमी झाल्या नाहीत किंबहुना त्या अधिक वाढतच गेल्या होत्या.कोळसा-शेणगवऱ्या विकून रमाईने महामनवाचा संसार सांभाळला रामाईच्या असीम त्याग समर्पणातुनच बाबासाहेब राष्ट्रनिर्मान कार्यात स्वतःला समर्पित करू शकले असे उदगार येवला बस आगाराचे नियंत्रक विकास वाहुळ यांनी काढले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर यांच्या पत्र अभिवाचनाने रमाईस येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी वाचनालय व राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येथे अनोखे अभिवादन करण्यात आले.
जेष्ठ साहित्यीक विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांच्या रमाई व योगीराज बागुल यांच्या प्रिय रामू ह्या ग्रंथाच्या निवडक प्रसंगाचे अभिवाचन राजरत्न वाहुळ,प्रीती पाठारे,पूजा झालटे यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सरिता शिरूड ह्या होत्या.
प्रारंभी रमाईच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.वाचनालय व अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ सर यांनी प्रास्ताविक केले.
स्मारक समितीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ वाघ,ऍड.स्मिता झालटे,रेखा साबळे,आशा आहेर,महेंद्र पगारे,ऍड.चंद्रकांत निकम,वैभव साबळे,संगीता वाहुळ इ.मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते रोहित गरुड,कुणाल ठाकरे,निलेश महाले,ओम पठाडे,तथागत अहिरे,शुभम मोरे,अजित काळे,प्रमोद वाघ,जीवन दळे,पंकज घुले आदी ह्यावेळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ तर आभार शरद शेजवळ यांनी मानले.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.