मुंबईहून शिर्डीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला मनमाड येथे थांबा असूनही, त्या रेल्वेचे तिकीट या रेल्वे स्थानकावरून काढले जात नाही.
मनमाड शहर हे नाशिक जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून शहराची लोकसंख्या तसेच मालेगाव शहर व इतर ग्रामीण भागातील प्रवाशांची संख्या लक्षात घेता सर्व प्रवासी मनमाड जंक्शन रेल्वे स्थानकावरून प्रवास करतात. प्रवाशांच्या गैरसोयीचा विचार रेल्वे प्रशासनाने करून लवकरात लवकर मुंबई शिर्डी वंदे भारत ट्रेन चे तिकीट मनमाड स्थानकाहून वितरीत करण्याची आग्रही मागणी आमदार कांदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.













