मंगळवारी एका मद्यधुंद वाहन चालकाने कोपरगाव ते मनमाडचे दिशेने जाताना अनेक वाहनांना धडक देत झालेल्या भीषण अपघातात अनेक जण गंभीर जखमी तर एक जण ठार झाल्याची घटना येवला शहर हद्दीत घडली आहे.
तामिळनाडू पासिंग असलेल्या एका ट्रकने येवला ते मनमाडच्या दिशेने जाताना येवला शहर हद्दीत अनेक लहान मोठ्या वाहनांना धडक देत मोठा अपघात घडला आहे. या अपघातात अनेक दुचाकी चार चाकी व व्यावसायिक वाहनांची नुकसान होऊन मोठे नुकसान झाले आहेत. मद्यधुंद असलेल्या वाहन चालकाने अनेक वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली असून एका युवकास आपले प्राण गमवावे लागले आहे.
रोशन मच्छिंद्र वाघमोडे (वय १९) हा या अपघातात मयत झाला असून तो आपल्या आई व नातेवाईकसोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेला असता ही दुर्दैवी घटना घडली. यावेळी त्याच्या सोबत त्याची आई व शेजारच्या काही महिला होत्या. लग्न काही दिवसावर येऊन ठेपल्याने धावपळ सुरु होती. त्यातच अशी घटना घडल्याने विखरणी गावावर शोककळा पसरली आहे.
ताबा सुटलेल्या ट्रकला विंचूर चौफुली येथे पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न देखील केला परंतु त्याचा वेग जास्त असल्याने पोलिसांना तो आवडता आला नाही. हा ट्रक मनमाडच्या दिशेने जाऊन अंकाई बारी येथे थांबल्यानंतर पोलिसांनी वाहन चालकाला अटक केली आहे.
अपघात घडविणाऱ्या वाहन चालकाला अंकाई बारी परिसरात येवला शहर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहे.













