loader image
[ays_poll id=7]

कुबेश्वर धामच्या चेंंगराचेंगरीत मालेगावच्या महिलेचा मृत्यू!

Feb 17, 2023


मध्य प्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे रुद्राक्ष वाटप आणि शिवमहापुराण कथेपूर्वीच परिस्थिती अनियंत्रित झाल्याने गेलेल्या भक्तांचे अतोनात हाल होत आहेत. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील महिलेचा मृत्यू झाला, असून तर तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.

मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील कुबेश्‍वर धाम रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान अचानक गर्दी वाढल्याने प्रशासनाचाही गोंधळ झाला. अशातच गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत महाराष्ट्रातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. रुद्राक्ष मिळण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. या गर्दीमध्येच मालेगावच्या एका महिलेची अचानक प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाला आहे. तर तीन महिला बेपत्ता झाल्या आहेत.

सिहोर जिल्हा मुख्यालयाजवळील चितवलिया हेमाच्या कुबेश्‍वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. कार्यक्रमापूर्वीच आठ लाखांहून अधिक भाविक सिहोरमध्ये पोहोचले. भाविकांच्या अतिरेकामुळे इंदूर-भोपाळ महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून महामार्गावर 20 किलोमीटरहून अधिक जाम असल्याचे सांगण्यात येत आहे.


अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.