loader image
[ays_poll id=7]

सोशल मीडियावर बंधने तर बँकांच्या कर्ज आणि ईएमआय देतांना मोजावी लागणार जास्त रक्कम – आज पासून झाले बदल

Mar 1, 2023


दर महिन्याला आर्थिक बाबतीत काही बदल होत असतात. मार्च महिन्यात सुद्धा काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनात दिसून येणार आहे. आजपासून काही नवीन नियम लागू होणार आहेत. 1 मार्च म्हणजे आजपासून आरबीआयने एमसीएलआर दर वाढवल्याने त्याचा परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होणार आहे. रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईट्सना नियमांचे पालन करावे लागणार आहे.
मार्च महिन्यात 12 दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मार्च महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यात एकूण 12 दिवस बँक सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात.

सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
आरबीआयने यापूर्वी रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर अनेक बँकांनी त्यांचे एमसीएलआर दर वाढवले आहेत. त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. एमसीएलआरच्या वाढलेल्या दराचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. आता लोकांना बँकांना ईएमआय देताना जास्त रक्कम मोजावी लागणार लागणार आहे.

ट्रेनच्या वेळेत होणार बदल
फेब्रुवारी महिना सरत असताना आता उन्हाळा सुरु झाला आहे. मार्चमध्ये रेल्वे प्रवासी आणि मालगाड्यांच्या वेळेत बदल करण्याची शक्यता आहे. 5000 मालगाडी आणि प्रवाशी गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
मार्च महिन्यात सोशल मीडिया वापरणाऱ्यांसाठी काही बदल होण्याची शक्यता आहे. सरकारने अलिकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना आता भारतात नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.