नांदगाव सोमनाथ घोंगाणे
आपल्या भावना शब्दरुपात मांडण्याची कला फार कमी लोकांना जमते. परंतु बाबुराव मानकरी यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर आपल्या भावनांना शब्दरूप देऊन फारकत ही कौटुंबिक समस्येवर आधारीत व दुसऱ्यांना बोध घेणारी सुंदर अशी कादंबरीची निर्मिती केली.त्यांचे कौतुक केले पाहिजे. ही कादंबरी साकारतांना त्यांच्या सौभाग्यवतींचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. त्यांच्या भावनांना वाट करून द्यायला मित्रपरिवार व कुटुंबातील सदस्यांच्या सहभाग आहे. फारकत कादंबरीतील अनुभव वाचून वाचकांनी सकारात्मक दृष्टिकोन जोपासला पाहिजे असे पुस्तकातील व्यक्त होते. असे प्रतिपादन नांदगावचे तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे यांनी केले. कृष्णाई लाॅन्स हनुमान नगर येथे बाबुराव मानकरी यांच्या फारकत कादंबरीचे प्रकाशन तहसीलदार डॉ सिध्दार्थ मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी, गीतकार व मुखपृष्ठकार विष्णू थोरे, शिवसेना महिला तालुका प्रमुख रोहिणी ताई मोरे,माजी नगरसेवक बालीकाका कवडे, सिध्दी प्रकाशनचे प्रकाशक ,लेखक,कवी संदीप देशपांडे, नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र लातुरचे संचालक अरुणकुमार गवळे, नांदगावचे ए.पी.आय.दिलीप सुरवाडकर, श्याम मोरे, ईगल कन्स्ट्रक्शनचे इंजिनिअर रंजनजी, साहित्य परिषद शाखा नांदगावचे अध्यक्ष प्रा.सुरेश नारायणे, कवयत्री प्रतिभा खैरनार, प्रकाश शिंदे, भारतीताई बागोरे, राजाराम गवांदे, जेष्ठ पत्रकार सुरेश शेळके, संजीव निकम, गिरणानगर ग्रामपंचायत सदस्य ॳॅड.उमेश सरोदे, राजेंद्र कुटे,सचिन आहेर, योगेश दळवी ,राजाराम गवांदे , लेखक बाबुराव मानकरी, सौ मानकरी, आदी मान्यवर उपस्थित होते.

बाबुराव मानकरी यांनी प्रथम प्रयत्नात लिहीलेली कादंबरी नक्कीच वाचनीय आहे.साध्या सरळ भाषेत विषय मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.आज समाजात फारकत ही एक भयावह समस्या निर्माण झाली आहे. साध्या-साध्या गोष्टी पती-पत्नीत वादावादी टोकाला जातात. त्या होऊ नये यासाठी कुटुंबाने प्रयत्नशील असावे या बाबतचा संदेश बाबुराव मानकरी यांच्या कादंबरीतुन दिसुन येते. असे प्रतिपादन प्रा.सुरेश नारायणे यांनी पुस्तकांचा परिचय करून देताना सांगितले. मानकरी यांनी संयमाने व जिद्दीने पुस्तकांची निर्मिती केली. याचा मोठा आनंद आहे. त्यांनी वास्तववादी विचार मांडून कादंबरी चे लिखान केले आहे. अनुभवांवर आधारित त्यांचे पुस्तक वाचकांना नक्कीच आवडेल. असे प्रतिपादन सिध्दी प्रकाशनचे प्रकाशक संदिप देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले. तर पुस्तक लिखनाबाबत लेखक बाबुराव मानकरी यांनी कादंबरी लाखांचा उद्देश त्यांच्या मनोगतातुन व्यक्त केला. आज कुटुंबातील संवाद हरवला आहे. वेगवेगळ्या कारणांनी कुटुंबातील नात्यात कटुता येते. नात्यातील दुरावा वाढला की त्यातुन फारकती सारख्या गोष्टी वाढत चालल्या आहे. यात समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे या विचारातुनच लेखकाने फारकत कादंबरीचे लिखान केले आहे त्यांच्या कादंबरीचे मुखपृष्ठ करण्याची संधी मिळाली व मानकरी परिवाराचा स्नेह वृद्धिंगत करण्याचा योग आला याचा आनंद वाटतो असे कवी , गीतकार,व मुखपृष्ठ कार विष्णू थोरे मनोगतात म्हणाले. नवजीवन व्यसनमुक्ती केंद्र लातुरचे संचालक अरुणकुमार गवळे साहेब यांनीही मनोगत व्यक्त केले व मानकरी यांच्या कादंबरी लिखाणास शुभेच्छा दिल्या. डॉ.मुकेश मानकरी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.सुरेश नारायणे यांनी करुन दिला. सुत्रसंचलन ॳॅड.विद्या कसबे यांनी केले. आभार सौ.माया गवळे यांनी मानले.बळवंत वाकोडे, अनिल बुरकुल, संदिप मानकरी, नितीन आंबेकर,दिपक त्रिभुवन,सोनु वाकोडे, राजेश कापसे, रविंद्र निकम, आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले












