loader image
[ays_poll id=7]

सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी बहरणार यंदाचा भिमोत्सव २०२३

Mar 14, 2023


मनमाड ता १३ –  शहरातील फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या व्यक्ती, संघटना, संस्थांनी एकत्र येत भीमोत्सव २०२३ या प्रबोधनात्मक, सामाजिक, सांस्कृतिक, कार्यक्रमांची रेलचेल असलेला सात दिवसांचा उत्सव साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे पावती पुस्तकेला, वर्गणी गोळा करण्याला फाटा देत उपस्थितांनी स्वतः पैसे जमा केले. यामुळे जयंती उत्सवात हा उपक्रम आदर्श ठरणार आहे.
                  
मनमाड शहरात साजरा होणारा जयंती उत्सव हा राज्यात प्रसिद्ध आहे. उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून अनुयायी येतात. एक विचारात्मक चळवळ उभी रहावी यासाठी शहरातील फुले, शाहू, आंबेडकरांना मानणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटनांनी एकत्र येत येथील इंडियन हायस्कूलच्या सभागृहात बैठक घेतली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘भीमोत्सव २०२३’ कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविले. यावेळी भीमोत्सव आयोजन समितीचे कोषाध्यक्ष, पत्रकार अमोल खरे यांनी मागील २०२२ वर्षीचा हिशोब अहवाल सादर केला. त्यास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. उपस्थितांनी स्वइच्छेने स्वतः पैसे जाहीर केले तर अनेकांनी पैसे देण्याचे कबूल केल्याने एक नवा पायंडा पडला आहे. उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. या भीमोत्सवात विचारवंतांची व्याख्याने, शाहिरी, जलसा, भीमगीते, स्पर्धा आदींसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. मनमाड महाविद्यायातील हिंदी विभागप्रमुख डॉ जालिंदर इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अध्यक्ष अथवा कार्यकारणी न निवडण्याचा मागील निर्णय याही पुढे कायम करण्यात आला. यावेळी भीमोत्सव समितीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, निलेश वाघ, संजय कटारे, सतीश केदारे, मयूर बोरसे, पापा थॉमस, साईनाथ गिडगे, प्रदीप गायकवाड, सचिन शिरूड, भीमा महिरे, फिरोज शेख, सुनील साळवे, एड प्रदीप संसारे, एड वाल्मीक जगताप, एड सागर गरुड, अशोक बिदरी, योगेश म्हस्के, गणेश केदारे, अरुण गरुड,  सुरेश आहिरे, सुशांत केदारे, विजय उबाळे, प्रभाकर बागुल, वाल्मीक रोकडे,  नरेन संसारे आदींसह मोठ्या संख्येने आंबेडकरी विचारांचे नागरिक उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.