loader image
[ays_poll id=7]

शासनाने जाहीर केलेले ३०० रुपये अनुदान तुटपुंजे – ६०० रुपये देण्याची शेतकऱ्याची आर्त हाक

Mar 15, 2023


कातरवाडी ताः चांदवड येथील शेतकरी भागवत झालटे यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या कांदा अनुदानाची रक्कम प्रति क्विंटल रुपये ६०० करण्याची मागणी केली आहे. राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे अवकाळी पावसाने शेतातील उभे पिक वाया गेले आहे. शेतकरी संपावर गेल्यावर सगळं महाग होईल कुठलाही भाजीपाला मार्केट मध्ये किंवा बाजारात येऊ दिला जाणार नाही दूध व सर्व पालेभाज्या त्यामुळे सरकारने लवकरात लवकर विचार करून भाव निश्चित करावे आणि अनुदान रू.600 जाहीर करावे सोयबीन, कापूस, हरभरा, कांद्याला बाजारात भाव मिळत नाही. कांद्याला यावेळी ४००-५०० रुपये भाव मिळत असून हा भाव अत्यंत कमी आहे. सरकारने प्रति क्विंटल ३०० रुपये अनुदान जाहीर केले आहे. ते अत्यंत तुटपुंजे आहे. कांदा उत्पादनास येणाऱ्या खर्चाचा विचार करून सरकारने हे अनुदान किमान ६00 रुपये करावे, अशी मागणी शेतकरी सामाजिक कार्यकर्ता भागवत झाल्टे यांनी केली आहे. शेतकरी वारंवार असमानी सुलतानी संकट सापडत आहे त्यात चांदवड तालुक्यातील गावामध्ये नुकसान भरपाई चे पैसे मिळत नाही फक्त शेजारी देवल्यातच मिळतात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्या पिकावर नांगर रोटर फिरवत आहे भाजी पाला हि कवडीमोल भावात विकला जात आहे अतिवृष्टीमुळे खरिप वाया गेला आणि आता पावसामुळे रब्बीचे नुकसान झाले शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. कांद्याने तर यावेळी शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे केले आहे. एक क्विंटल कांदा उत्पादनासाठी ११०० ते १२०० रुपये खर्च येतो. कांदा काढण्यासच विंटलला ३०० रुपये लागतात हा खर्च पाहता सरकारने जाहीर केलेले ३०० रुपयांचे अनुदान हे अत्यंत तुटपुंजे असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांवर सरकार मेहरबान असल्याचे चित्र दाखवण्यात आले. घोषणाच घोषणा करण्यात आल्या आहेत प्रत्यक्षात मात्र हे सरकार शेतकऱ्यांना मदत देताना हात आखडता घेत दिसून आले आहे. संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करून किमान ६००.रु प्रमाणे कांद्याला अनुदान द्यावे.

एक शेतकरी भूमिपुत्र श्र भागवत राजाराम झाल्टे कातरवाडी तालुका चांदवड


अजून बातम्या वाचा..

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

शिवसेनेच्या तीव्र आंदोलनानंतर पिंपरखेड टोल नाका बंद; पगारवाढ आणि सुविधांसाठी एल्गार!

​नांदगाव : प्रतिनिधी सुमितकुमार जगधने आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरखेड (ता....

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक अनिश्चित कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता

राज्यातील 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलंडलेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्यास सुप्रीम...

read more
.