सुमारे हफ्त्याभरा पासून राज्यातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक आणि इतर अधिकाऱ्यांनी पुकारलेला संप अखेर आज मिटला आहे. संप मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. संपकऱ्यांची प्रमुख मागणी असलेली जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे संप समन्वय समितीने म्हटले आहे. त्यामुळे आजपासून हा संप मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
गोदावरी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करा – प्रवाशी संघटनेची मागणी
गोदावरी एक्सप्रेस व मनमाड इगतपुरी शटल सेवा मनमाड वरून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यासाठी व मनमाड,...










