loader image
[ays_poll id=7]

संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच – चिरंजीव सानप

Mar 22, 2023


आज रा स्व संघ मनमाड शाखेचा वर्ष प्रतिपदा उत्सव साजरा झाला. प्रमुख वक्ते म्हणून मालेगांव येथील चिरंजीव सानप हे होते.त्यांनी वर्ष प्रतिपदा या दिनाचे प्राचीन महत्व सांगून त्याच दिवशी डॉ हेडगेवार यांचा जन्मदिन हा केवळ योगायोग नसून परमेश्वराने हिंदू संघटनेच्या कार्यासाठी जणू अवतार घेतला असावा का अशी भावना तयार होते, कारण गेली ९८ वर्ष त्यांनी स्थापन केलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सातत्याने केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील हिंदूंना केवळ संघटीत नव्हे तर प्रभावित करून वसुधैव कुटुंबकम हा विश्वास सर्वांमध्ये निर्माण केला.अर्थात समस्या त्यावेळी होत्या आजही आहेत पण आज संघटीत समाज अनेक समस्यांवर मात करून भारत देशाला सर्व स्तरावर पुढे नेण्यासाठी समाज समर्थ झालेला आहे. २०२५ मध्ये जेव्हा संघ शताब्दी साजरी होत असेल तेव्हा भारतातील प्रत्येक घरात संघ पोहोचला असेल असे नाही तर प्रत्येक घरातून संघाला बळ मिळेल असा प्रभाव आपण सर्व मिळून निर्माण करू त्यासाठी संघ शाखांचे काम मोठ्या प्रमाणात उभे करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे व त्यासाठी युवकांनी तयार रहावे असे आवाहन केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेश घुगे,चेतन गंगेले ,अनंता भामरे ,स्वप्नील मोहरीर ,रमाकांत मंत्री , राजेश बुऱ्हाडे, प्रमोद मुळे इत्यादींनी प्रयत्न केले कार्यक्रमात संघासह भाजपा,वनवासी कल्याण आश्रम,बजरंग दल संत संपर्क विभाग आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते मुख्य कार्यक्रमानंतर सघोष संचलन गावातील प्रमुख मार्गावरून निघाले त्याचे नागरिक बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले पोलीस विभागाने देखील चोख व्यवस्था केली होती.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.