loader image
[ays_poll id=7]

नंदुरबार जिल्हा संघात भुमी क्रिकेट अकॅडमीतील महिला खेळाडु साक्षी शुक्लाची निवड

Mar 27, 2023


नंदुरबार जिल्हा क्रिकेट सोसिएशन येथे नुकत्याच झालेल्या नंदुरबार वरिष्ठ महिला जिल्हा संघाच्या निवड चाचणी मध्ये मनमाड येथील भुमी क्रिकेट अकॅडमी मधील खेळाडु साक्षी शुक्ला या खेळाडुची महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन द्वार आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हा संघामध्ये निवड झाली. छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथे या मॅचेस २७ मार्च २०२३ पासुन खेळवल्या जाणार आहेत ज्यात साक्षी शुक्ला सहभागी होईल.
या सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन करुन साक्षी महाराष्ट्र राज्याच्या संघात सामील होऊन मनमाडसाठी पहिली रणजी खेळाडु होवो अशी अपेक्षा तिच्याकडून केली जात आहे.

मनमाड शहरातुन वरिष्ठ महिला जिल्हा संघासाठी खेळणारी साक्षी शुक्ला हि प्रथम महिला खेळाडु असेल. तिच्या चांगल्या कामगीरिसाठी सर्वाकडुन जागोजागी शुभेच्छा देण्यात येत आहेत. या कामगिरीसाठी साक्षीचे प्रशिक्षक श्री. सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांचे मार्गदर्शन तिला लाभले.

भुमी क्रिकेट अकॅडमी मनमाड चे आधारस्तंभ ईरफान मोमीन व मार्गदर्शक राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक , संजय निकम , श्रेणिक बरडिया , हबीब शेख , तय्यबभाई शेख , सिध्दार्थ बरडिया,परवेज शेख , कौशल शर्मा , सनी पाटिल , सनी फसाटे
तसेच संचालक वाल्मीक रोकडे व सिध्दार्थ ( भोला ) रोकडे यांच्या तर्फे साक्षी शुक्ला हिचे अभिनंदन करुन पुढिल होणार्या सामण्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.