loader image
[ays_poll id=7]

मार्च एंड आणि २८ एप्रिल पर्यंत गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत – बाजार पेठेत शुकशुकाट

Mar 28, 2023


गेल्या तीन चार महिन्यांपासून सुरू असलेल्या लग्नसराईला १९ मार्चपासून विवाह मुहूर्त नसल्याने, तसेच पंचांगानुसार ३१ मार्च ते २८ एप्रिलपर्यंत गुरू लोप असल्याने तब्बल दीड महिन्याचा म्हणजे ४५ दिवसांचा ब्रेक लागला आहे.

यंदाही लग्नसराईला तुळशी विवाहापासून ५ नोव्हेंबर २२ नंतर सुरवात झाली. परंतु विवाह मुहूर्त चार दिवसच होते. उर्वरित शुक्र अस्तात नऊ मुहूर्त होते. डिसेंबर २२ या महिन्यात आठ विवाह मुहूर्त होते. जानेवारी २३ मध्ये चार, फेब्रुवारीमध्ये नऊ व मार्चमध्ये पाच मुहूर्त होते. ५ नोव्हेंबर

२२ पासून ते १९ मार्च २३ पर्यंत लग्नाचा बार मोठ्या संख्येने उडविण्यात आले. विवाह मुहूर्त कमी असल्याने ग्रामीण, तसेच शहरी भागात घटिक व गोरज मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर लग्नाची धामधूम दिसून आली. मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा असल्यामुळे लग्नसमारंभांची संख्या प्रमाणातच होती. एप्रिल महिन्यात गुरू लोप असल्याने विवाह मुहूर्त नाहीत. मेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होण्याची चिन्ह दिसत आहेत. नोकरवर्ग, तसेच शेतकरीवर्गात मे महिन्याला जास्त पसंती दिली जाते. शाळा, महाविद्यालयांना या महिन्यात
सुटी असते. तसेच ग्रामीण भागात शेतकरी शेतीकामाकडे वळत असल्यामुळे जूनमध्ये कुटुंबातल्या विवाह करणाऱ्या मुला-मुलींच्या विवाहाच्या तारखा शक्यतो धरत नाहीत. तसेच पावसाळाही सुरू होतो. विड्याच्या पानापासून ते सोन्याच्या आभूषणांपर्यंत विवाहकार्यात लागणाऱ्या वस्तूंमुळे एक ते दीड महिन्याच्या काळात बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल थांबण्याची शक्यता आहे. गुरू लोप असला तरी एप्रिल महिन्यात काही पंचांगानुसार १५, २३, २४, २९, ३० या दिवशी विवाह मुहूर्त दिलेले असले तरी या काळात विवाह होण्याची शक्यता कमीच असते, असे काही पुरोहितांचे म्हणणे आहे. सोयीनुसार विवाह तारखा धरल्या जातात.


अजून बातम्या वाचा..

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार  माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

येत्या काही महिन्यात तालुक्यातल्या किमान २५ हजार माता भगिनींना घरातच रोजगार उपलब्ध करून देणार.. आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणार… सौ. अंजुम ताई सुहास कांदे

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत शासकीय विश्रामगृहातील सभागृहात स्वयं...

read more
मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.