loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ – मनमाड लोहमार्ग पोलीसांनी लॅपटॉप चोरणाऱ्यास केली 24 तासाच्या आत अटक

Mar 31, 2023


 गुरुवार दिनांक 30/ 3/ 2023 रोजी विशाल सुरेश राठोड वय वर्ष 20 राहणार शेवळी तांडा तालुका जिल्हा जालना हे मनमाड येथील बुकिंग ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या वेटिंग हॉलमध्ये झोपले असता त्यांची एक काळा रंगाची लॅपटॉप असलेल्या आधार कार्ड, पॅन कार्ड व इतर वस्तू अशा एकूण 43000 रुपये किमतीच्या वस्तू चोरीस गेल्या होत्या. त्यावरून रेल्वे पोलीस स्टेशन मनमाड येथे गुन्हा नोंद क्रमांक 234/ 23 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन सीसीटीव्ही आधारे व मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी समाधान सुरेश वाघ,वय 25 वर्ष, राहणार नाशिक बॅगसह मिळून आला. पोलीस स्टेशनला आणून खात्री केल्यानंतर त्याने वर नमूद गुन्ह्यातील चोरलेला लॅपटॉप त्याच्याकडे मिळून आल्याने सदरचा लॅपटॉप व इतर वस्तू हस्तगत करून त्यास गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार खडककर हे करत आहेत. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री गणेश शिंदे लोहमार्ग औरंगाबाद मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड श्री दीपक काजवे ,पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघमोडे , सफौ दिनेश पवार, पोह रवींद्र खडतकर पोलीस नाईक महेंद्र पाटील पोलीस शिपाई राहुल राजगिरे, जितेंद्र देशमुख , राकेश ठाकूर महेंद्र माळी यांनी केली.

 


अजून बातम्या वाचा..

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे,महाविद्यालय उमराणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना श्रम संस्कार शिबिराचे समारोप.

उमराणे:- श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळ,उमराणे संचलित,मा.तात्यासाहेब तथा विश्वासराव देवरे कला,...

read more
महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

महाराष्ट्र एनसीसी संचालनयाची हॅटट्रिक – सलग तिसऱ्यांदा पटकावला ‘प्रधानमंत्री बॅनर ‘

प्रजासत्ताकदिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या एनसीसी विद्यार्थ्यांनी...

read more
नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा  पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव पाणी प्रश्न गंभीर तिसऱ्यांदा रास्ता रोको… तिन आठवड्यातुन एकदा पाणी…? ग्रामीण भागात हीच अवस्था

नांदगाव : मारुती जगधने नांदगाव शहराचा पाणी प्रश्न जटील बनत चालला असून एकाच ठिकाणी त्याच मार्गावर...

read more
.