एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक – २ ..मनमाड विभाग,प्रकल्प अधिकारी मा.श्री.वाकडे सर तसेच मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम याच्यां मार्गदर्शनाखाली कार्यरत अंगणवाडी सेविका ताईनी रँलीचे आयोजन केले,, किशोरी वयीन मुलींनी आहारात भरडधान्यांचा वापर करणे या विषयी मार्गदर्शन करताना पथनाट्याचे आयोजन करण्यात आले.
सध्या बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उध्दभवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.बाजरी,ज्वारी,नाचणी वरई,राजगिरा,राऴा,इतर ही यासारखे असे पौष्टीक तृणधान्ये ही कार्बोदके,प्रथिने,जीवनसत्व आणि खनिजांनी समृध्द आहे .तसेच यात भरपुर प्रमाणात ततुंमय पदार्थ असतात ..आपण रोजच्या आहारात भरडधान्याचा वापर केला तर आपले आरोग्य निरोगी राहणार आहे.म्हणुन सर्वानी भरडधान्यांचा आहारात समावेश आवश्य करायचा आहे आणि पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणण्यास हातभार लावायचा आहे..
सर्वासाठी पोषण- निरोगी भारताकडे एकत्रित वाटचाल
श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन
मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...











