एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प(नागरी) नाशिक -२.अंगणवाडी क्र.६३.मनमाड विभाग येथे सेविकाताई जयश्री वडनेरे यांनी पोषणाची गुढी उभारुन भरडधान्यांचे महत्व पालकांना पटवुन दिले..आपल्या रोजच्या आहारातील पोषणमुल्य वाढविण्यासाठी भरडधान्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी मुलांच्या विविध वेशभुषा करुन जनजागृती करण्यात आली.. विविध भरडधान्यांचे स्लोगन फलकांचा वापर करून मार्गदर्शन करण्यात आले..
सध्या बदलत्या जीवनशैलीत आहाराकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यामुळे उध्दभवणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी तृणधान्याचा आहारात समावेश करणे ही काळाची गरज आहे.बाजरी,ज्वारी,नाचणी वरई,राजगिरा,राऴा,इतर ही यासारखे असे पौष्टीक तृणधान्ये ही कार्बोदके,प्रथिने,जीवनसत्व आणि खनिजांनी समृध्द आहे .तसेच यात भरपुर प्रमाणात ततुंमय पदार्थ असतात ..आपण रोजच्या आहारात भरडधान्याचा वापर केला तर आपले आरोग्य निरोगी राहणार आहे.म्हणुन सर्वानी भरडधान्यांचा आहारात समावेश आवश्य करायचा आहे आणि पोषणाच्या वर्तनात बदल घडवुन आणायचा आहे..
श्रीराम जन्मोत्सव निमित्त मनमाडला बुधवारी बैठकीचे आयोजन
मनमाड- सालाबादप्रमाणे 1986 पासून सलग 40 व्या वर्षी यंदाही श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे...











