बार्टीकडे अर्ज केलेले व सर्व पात्रता अटी पूर्त केलेले फेलोशिप साठी पात्र असलेले संशोधक विद्यार्थी दिनांक २० फेब्रुवारी, २०२३. पासुन आझाद मैदान येथे त्यांच्या न्यायिक व हक्काच्या फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत असून ०७एप्रिल, २०२३. पर्यंत जवळपास ४७ दिवस होत आहे परंतु आजपर्यंत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्यायिक मागण्यांची गंभीर दखल घेतलेली नाही. आझाद मैदान येथे धरणे आंदोलनास बसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची मागणी न्यायिक असून, महाराष्ट्र भरातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येवून “विद्यार्थी संघटना संयुक्त समिती” वतीने धरणं आंदोलन सुरू केले आहे त्याच्या न्यायिक मागणीला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना मनमाड तहसीलदार द्वारा निवेदन झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
सदर निवेदन तलाठी प्रतिभा नागडवाल मॅडम यांनी स्वीकारले.
यावेळी भाषण सचिन इंगळे सागर साळवे सिद्धार्थ जोगदंड, काँग्रेस चे भीमराव जेजुरे, फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख आदी चे भाषणे झाली.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय गेडाम, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन शाखा मनमाड चे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, निलेश इंगळे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव किरण वाघ, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, अनिल अहिरे, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे माजी सचिव संदीप धिवर,राकेश ताठे, प्रेमदिप खडताळे, राहुल शिंदे सचिन इंगळे, संदिप पगारे, सुनिल सोनवणे, विनोद झोडपे, फकिरा सोनवणे, दिपक राऊत, विशाल त्रिभुवन, विनोद खरे, कल्याण धिवर, रविंद्र पगारे, संजय केदारे, मनिष कासवटे, निखिल सोनवणे,नदीम सैय्यद, किरण वणिस, अविनाश गायकवाड, आदी उपस्थित होते.





















