मनमाड – मनमाड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याची आगळी परंपरा आहे. कायदा व सुव्यवस्था पाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत व उत्साहात साजरी करावी” असे आवाहन अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी केले.
मनमाड पोलिस स्थानकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत अनिकेत भारती बोलत होते. प्रशासनाने सर्व समस्यांचे निरसन करून मिरवणूक काळात अडसर येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिस उपअधीक्षक समरसिंह साळवे यांनी केल्या. कार्यकर्त्यांनी भान पाळून गैरकृत्य करू नये. गैरकृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणीही पाठीशी घालणार नाही. कार्यकर्त्यांनीही आपली जबाबदारी सांभाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असा सूर उपस्थितांनी व्यक्त केला
यावेळी रिपाई जिल्हाध्यक्ष राजेंद्र आहिरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पगारे, अँड. सुधाकर मोरे, गंगाधर त्रिभुवन, गुरुकुमार निकाळे,
महेंद्र गरुड, एस. एम. भाले, मास्टर अन्वरभाई, डॉ. वर्षा झाल्टे आदींनी विविध सूचना केल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी समरसिंग साळवे, रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख गंगादादा रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख गंगादादा त्रिभुवन, भीमोत्सव आयोजन समितीचे निमंत्रक दिनकर धिवर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश वाघमारे, शिवसेनेचे (ठाकरे गट) उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद, अशोक पाईक, व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र पारीक, एस. एम. भाले, अॅड. आम्रपाली निकम, सुभाष
नहार, दिलीप नरवडे, शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख मयूर बोरसे, उमाकांत राय, राजू पवार, वंदेश गांगुर्डे, सुनील साळवे, प्रमोद आहिरे, सिद्धार्थ संसारे, सन्नी फसाटे, नाना जाधव, फुले, शाहू, आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज शेख, कृष्णा पगारे, कादीर शेख, प्रशांत दराडे, विशाल छाजेड, राहुल घोडेराव, कमलेश गरुड आदींसह विविध पक्षांचे कार्यकतें, सार्वजनिक जयंती उत्सव समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी सूत्रसंचालन केले.












