loader image
[ays_poll id=7]

अयोध्या दौऱ्यावरून परतताच मुख्यमंत्री नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर – नुकसान भरपाईची घोषणा होणार ?

Apr 10, 2023


नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली बळीराजा संकटात सापडला आहे. अशातच अयोध्या दौऱ्यावरून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर नाशिक तालुक्यात पाहणी दौऱ्यावर आहेत.

 

 

नाशिकसह जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने रविवारी अक्षरशः झोडपून काढले आहे. नाशिक तालुक्यासह जिल्ह्यातील सटाणा (Satana), देवळा, नांदगाव, सिन्नर आदी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह गारांच्या वर्षांवासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. अशातच अनेक भागात शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर होते. अशातच काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकसह जिल्ह्यातही नांदगाव,बागलाण चांदवड, देवळा,सिन्नर येथे वादळी वाऱ्यासह गारपिट झाल्याने शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. महिनाभरात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाने हजेरी लावली असून नाशिकमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने विद्युत पुरवठा बंद झाला तर झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने वाहतूक देखील बंद झाल्याचे पाहायला मिळाले.

नांदगाव तालुक्यात अगोदर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अगोदर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.