loader image
[ays_poll id=7]

अंगणवाडी क्र ७५ मनमाड विभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

Apr 14, 2023


एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प (नागरी) नाशिक -२.आ.श्री.वाकडे सर आणि मुख्यसेविका शितल गायकवाड मॅडम याच्यं मार्गदर्शनाखाली कार्यरत मनमाड विभाग,अंगणवाडी क्र.७५. येथे डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सर्व प्रथम विश्वविख्यात,अर्थतज्ञ,मनववंश शास्त्रज्ञ, स्त्री उध्दारक, विश्वभुषण,भारतरत्न,धम्मचक्र प्रवर्तक,बोधीसत्व असे संबोधले जाणाऱ्या महामानवास त्रिवार अभिवादन देऊन नाचुन नाही तर वाचुन जयंती साजरी करु या ,आज ज्ञान दिवस साजरा केला जातो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन ज्ञानदिवस साजरा करु या ,स्त्री पुरुष समानता ठेवुन सर्वाना शिक्षित करु या .मुलांच्या विकासाच्या निगडीत संधी उपलब्ध करून त्यांच्या सर्वागिंन विकासास चालना देवु या ,सुजाण पालकत्वाची भुमिका स्विकारुन मुलांना सुयोग्य संधी देवु या,
मोजु तरी कशी उंची तुमच्या कर्त्तृत्वाची,,तुम्हीच जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची..
तुम्ही देव ही नव्हते आणि देवदुत ही नव्हते..तुम्ही तर मानवतेची पुजा करणारे खरे महामानव होते..अशा या महामानव डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार अभिवादन.
लोकशाही संविधान देऊन विभाजित समाजाला एका समानतेच्या धाग्यात बांधणाऱ्या तसेच जगात स्त्री आणि पुरुष ह्या दोनच जाती असाव्या आणि मानवता हा धर्म असावा असे विचार असणारे आणि अशा आदर्श विचारांची शिदोरीआपल्या सर्वानां डाँ.बाबासाहेब आंबेडकर याच्यांकडुन मिळाली आहे. त्यांचे विचार हे खरोखरच प्रेरणा दायक होते .जर अशा महामानवाचे विचार आमलात आणले तर कठीण परिस्थितीवर ही आपल्याला अगदी सहज मात करता येईल .यशाची उंची गाठता येईल. अशा चांगल्या विचारांचा अवलंब सर्वानी केला तर नक्कीच खऱ्या अर्थाने जयंती साजरी होईल.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.