loader image
[ays_poll id=7]

तेज कवडे यांची बाजार समितीच्या निवडणुकीतून माघार

Apr 19, 2023


नांदगाव सोमनाथ घोंगाणे

नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे तब्बल १४ वर्षे सभापती असलेल्या तेज प्रकाश कवडे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने बाजार समिती निवडणूकीत राजकीय भुकंप

नांदगाव बाजार समितीची निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्र माघार घेण्यास दोन दिवस शिल्लक असतानां तालुक्यातील सहकार महर्षी जेष्ट नेते प्रकाश ( बापूसाहेब ) कवडे यांचे चिंरजीव तेज कवडे यांनी निवडणूकी तून अचानक माघार घेतल्याने तालुक्यात राजकीय भुकंप झाला असून यामध्ये काय गुढ दडलयं अशा चर्चेला उधाण आले असून भविष्यात तालुक्यात काय घडामोडी घडतील हे ही सांगता येत नाही.
तेज कवडे यांनी १४ वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम केले आहे. तसेच जेष्ट नेते सहकार महर्षी बापूसाहेब कवडे यांनी ५ वर्ष अशी तब्बल १९ वर्ष कवडे यांच्या कडे बाजार समितीची एकहाती सत्ता होती .

आज त्यांनी दोन्ही गटातून माघार घेतली आहे. यामध्ये निश्चितच काही गुढ दडलयं का? आणि भविष्यात कोणता 
राजकीय भुकंप होईल का? अशी कुजबूज मतदार संघात सुरू झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचे नामनिर्देशन पत्र माघार घेणेसाठी (दि. 20) तारीख मुदत असल्याने आज रोजी माजी सभापती तेज कवडे यांनी दोन्ही गटातून आपले नामनिर्देशन पत्र माघार घेतले तसेच समाधान पाटील, कैलास पाटील, भाऊसाहेब काकळीज यांनी एका गटातून माघार घेतली .
तेज कवडे यांनी त्यांच्या कारकिर्दीत बाजार समितीचे कामकाज हायटेक पध्दतीने व पारदर्शक केल्याने बाजार समितीचा नावलौकीक महाराष्ट्रा मध्ये गाजत आहे .
नांदगाव बाजार समिती साठी दोन पॅनल होणार हे जवळपास नक्की झाले असून सत्ताधारी गटाचे आमदार  सुहांंस कांदे व जेष्टनेते बापूसाहेब कवडे यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल तर महाविकास आघाडीचे जगन्नाथ धात्रक, माजी आमदार  अँड.अनिल आहेर ,पंकज भुजबळ ,राजेद्र देशमुख , संजय पवार  दुसऱ्या पॅनलमध्ये असणार आहे.
सोसायटी गटातून ११ जागा, ग्रामपंचायत गटातून ४ जागा,  व्यापारी गटातून २ जागासाठी तर  हमाल मापारी गटात १ जागा अशा १८ जागांसाठी सदर निवडणूक होणार असून सर्वच गटात गटा – तटाच्या राजकारणा बरोबर जातीचा निकषावर  भर दिला जाणार असल्याचे दिसून येत आहे. याला अपवाद व्यापारी गट असून व्यापारी गटात जैन / ओसवाल / माहेश्वरी समाजा बरोबरच माळी समाजाचे एक गठ्ठा मतदार असून सत्ताधारी आ. कांदे गटा कडून एकाच माहेश्वरी समाजाचे दोन उमेदवार नक्की झाले असून विरोधी महाविकास आघाडीने माळी समाजाचा उमेदवार दिला असून  जैन व ओसवाल समाजाला सत्ताधारी गटाने उमेदवारी न दिल्याने हे दोन्ही मोठे समाज नाराज झाल्याने याचा फटका बाजार समितीच्या निवडणूकी बरोबरोच पुढील येणाऱ्या निवडणूकीत कुणाला बसणार आहे. हे येणारा काळच ठरवेल.


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.