loader image
[ays_poll id=7]

समाजाला बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांची गरज – लोकशाहीर संभाजी भगत

Apr 19, 2023


मनमाड ता १९ : आपला देश भांडवलदारांच्या, सत्ताधिषांच्या मुठीत असून सामान्य कष्टकर्यांचे शोषण सुरू आहे. वंचित समाज आणि मजूर होरपळून निघाला आहे. अशावेळी या लोकांना ओळखून समाजाने वागायचे आहे!  समाजाला बाबासाहेबांच्या प्रेरक विचारांची गरज आहे! बाबासाहेब येणार आहेत पण ते पुतळ्यातून येणारं नाहीत. किंवा पुन्हा जन्म घेणार नाहीत तर ते इथल्या तरुणाच्या चळवळीतून येणार असल्याचे परिवर्तनाचे विचार आपल्या शाहिरी जलशातून पहाडी आवाजात लोकशाहीर संभाजी भगत यांनी येथे मांडले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त सुरू झालेल्या भीमोत्सवाची सांगता लोकशाहीर संभाजी भगत यांच्या थेट ऑस्करला धडकलेला आंबेडकरी विद्रोही शाहिरी जलसाच्या सादरीकरणाने एकात्मता चौकात झाला. तत्पूर्वी डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यापासून भीमोत्सव आयोजन समितीचे आयोजक अमोल खरे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली. सर्वच महामानवांच्या संदर्भात होत असलेले वैचारिक प्रदूषण दूर होणे गरजेचे आहे. संकुचित वृत्तीची अडचण आणि जाती व धर्माची कुंपणे लावण्यात आल्याने महामानवांच्या विचारांना पाहिजे तसे व्यापक स्वरूप येऊ शकले नाही. त्यामुळे कुंपणे तोडून महापुरुषांच्या विचारांना व्यापक स्वरूप देण्याचे काम करण्याची गरज आहे. या जाणिवेतूनच शाहिरीतून प्रबोधनाचे कार्य करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या पहाडी आवाजात आंबेडकरी चळवळीतील महिलांचे योगदान विषद करताना ‘ माझा भीम मले सांगतो काही, मले भेटतो बाई…’ असे गीत सादर केले. महिलांवरील अन्याय आणि अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ‘घ्या कळ्यांची काळजी, आले आले गारदी…’ असे प्रेरणादायी गीतही शाहीर भगत यांनी सादर केले. खास आग्रहावरुन ‘ हिटलर के साथी, जनाजो के बाराती, पुछते नही इन्सा को पुछते धर्म और जाती’ हे गीत सादर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘राजे जी जी जी…’ हा पोवाडा सादर केला. पण समाजासाठी काय.., ओ अक्टिंग करते भाई.., हम फॅटिंग करते भाई.., या शाहिरीसह  ते म्हणाले की, डाॅ. बाबासाहेबांचे विचार समाज बदलणारे होते हे अनेकांना माहीत नाही. जोतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधली. बाबासाहेबांनी शेतीवर लिखाण केले. येणारा काळ वाईट आहे, विचार मारले जातील. युद्ध विरोधी भूमिका बुद्धांनी घेतली. काही वेळात देशात धर्म उभे केले जाते. पायाभूत काम आपण केले पाहिजे, असा शाहीर संभाजी भगत यांनी शाहिरी जलशातून प्रबोधनाचा जागर मांडला. जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना दाद दिली. हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असाच ठरला भीमोत्सवात पहिल्यापासूनच कार्यक्रमामध्ये आगळे वेगळे वैशिष्ट्य टाकण्यात येऊन वैचारिक, परिवर्तन आणि प्रबोधनत्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. भीमोत्सव आयोजन समितीचे आयोजक राजेंद्र पगारे, दिनकर धिवर, अनिल निरभवणे, अमोल खरे, संजय कटारे, डॉ जालिंदर इंगळे, निलेश वाघ, सतीश केदारे, मयूर बोरसे, राजेंद्र जाधव, संदीप नरवडे, पापा थॉमस, रामदास पगारे, मनोज ठोंबरे, भीमा महीरे, शेखर अहिरे, भास्कर कदम, अशोक परदेशी, बळवंत आव्हाड, पिंटू कटारे, दादाभाऊ शार्दुल, सचिन मुंडे, संतोष भोसले, फिरोज शेख, कदिर शेख, विक्की सुरवसे, शाहीर शरद शेजवळ, विनोद अहिरे, प्रभाकर बागुल, सुरेश अहिरे,
प्रकाश पठाडे, नरेन संसारे, राकेश कोल्हे, महेंद्र गरुड, सतीश शेकदार, संदीप देशपांडे, उपाली परदेशी, अशोक बिदरी, नाना अहिरे, योगेश म्हस्के, अफरोज अत्तार, अनिस शेख, विलास अहिरे, अनिल अहिरे, राजेंद्र पा, अर्जुन साळवे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.