मनमाड,लासलगाव,निफाड आणि नाशिकच्या चाकरमान्यांची जीवनवाहिनी असलेली मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी कोरोना काळापासून प्रशासनाने बंद करून प्रवाशांच्या तोंडाला पाने पुसली होती. वेळोवेळी निवेदने देऊन अखेर रेल्वे प्रशासनाने पर्यायी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करून प्रवाशांना दिलासा दिला होता मात्र आता तीच गाडी धुळ्याहून सोडत असून ह्या ३,४ दिवसातच मनमाड कर प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. धुळ्याहुन येणारी ही गाडी मनमाड पोहचेपर्यंत प्रवाशांनी तुडुंब भरलेली असते. मनमाडकर नागरिक जे रोज नाशिक येथे ये – जा करतात त्यांच्या समोर नाशिकला पोहचण्याचा यक्ष प्रश्न निर्माण झाला असून रेल्वे प्रशासन जाणून बुजून प्रवाशांना त्रास देण्याच्या हेतूने हे सर्व करत असल्याचा सूर प्रवाशांकडून होत आहे. आज सकाळी धुळ्याहुण आलेल्या ह्या गाडीची परिस्थिती सोबत च्या व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकता….अक्षरशः दरवाजात उभे राहून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. गाडी सुटल्यावर शेवटच्या डबा पकडण्याच्या प्रयत्नात आज एका विद्यार्थिनीचा तोल जाऊन पडल्यामुळे किरकोळ जखमी झाली. आज नाशिक येथे सदर विद्यार्थिनीचा लेखी पेपर होता असे कळते.रेल्वे प्रशासनाने मनमाड तसेच नाशिक जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करून त्वरित मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस पुन्हा एकदा सुरू करून प्रवाशांना न्याय द्यावा अशी मागणी केली जात आहे.
1 एप्रिल पासून टोलवर ‘नो कॅश’
टोलनाक्यांवरील मानवी हस्तक्षेप व वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग...











