loader image
[ays_poll id=7]

मनमाडकरांची “गोदावरी” पुन्हा सुरू करा ; अन्यथा जनआंदोलन

May 17, 2023


मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस कोविड काळापासून रेल्वे प्रशासनाने बंद करून मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांच्या तोंडाला पाने पुसली होती. अनेक निवेदने देऊन शेवटी रेल्वे प्रशासनाने पर्यायी गाडी सुरू केली, सुरुवातीला सी एस टी पर्यंत धावणारी ही गाडी नंतर दादर पर्यंत करण्यात आली. काही महिन्यांनंतर आठवड्यातून तीन दिवस आणि आता तर ही गाडी धुळ्याहून सुरू केल्याने मनमाड हून रोज नाशिक येथे जाणारे चाकरमानी आणि विद्यार्थी यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गाडीत असलेली तोबा गर्दी मुळे रोज प्रवाशांमध्ये वाद होत असून त्यामुळे तिकीट काढूनही येथील चाकरमान्यांना जागा मिळत नसल्याने रोजच भांडणाचा सामना करावा लागत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या हाल-अपेष्टांचे काही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे. प्रवाशी संघटनेसह लोकप्रतिनिधींनी मागणी करूनही गाडी मनमाडहन सोडली जात नसल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात संतापाची लाट निर्माण होत आहे.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.