मनमाड – खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी दत्तू जाधव यांची पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. मनमाड येथील सेंट झेवियर्स हायस्कूल येथे कार्यरत असलेले शिक्षक श्री. दत्तू जाधव यांची भारतीय प्राधिकरण भारत सरकारच्या वतीने उत्तर प्रदेश ( गौतम बुद्ध नगर) येथे आयोजित केलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे.या स्पर्धा उत्तर प्रदेश (गौतम बुद्ध नगर) येथे २३ते२७ मे दरम्यान संपन्न होणार आहेत. यापूर्वीही त्यांनी अनेक राज्य कबड्डी स्पर्धेत पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रेव्ह. फा. माल्कम, फा. लॉईड, पर्यवेक्षिका सि. ज्योत्स्ना, सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न
मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...








