loader image
[ays_poll id=7]

गिरणाधरण परिसरातील आदिवासी मच्छिमार बांधवांचा महामेळावा संपन्न

Jun 6, 2023


 

नांदगाव

नांदगाव विधानसभा मतदार संघातील गिरणाडॅम परिसरातील मच्छीमार आदिवासी बांधवाचा महामेळावा आ.सुहास कांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गिरणा डॅम येथील गैर रित्या दिलेल्या ठेकेदारी विरोधात संपन्न झाला

नांदगाव विधानसभा मतदारसंघातील गिरणा डॅम परिसरातील जवळपास २५ गावांतील मच्छीमार आदिवासी बांधव या मेळाव्यास उपस्थित होते.
गिरणा डॅम परिसरातील वार्ही बर्डी येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात जवळपास ५ ते ६ हजार आदिवासी बांधव उपस्थित होते

आदिवासी बांधवांसाठी मोफत फिरता दवाखाना अंतर्गत डोळे तपासणी व इतर आजार तपासणी व औषधे मोफत तसेच सर्व शासकीय सुविधा कार्यालय मार्फत विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कॅम्प लावण्यात आला होता .

धरणावरील मासे मारी व्यवसाय करण्याचा पहिला हक्क स्थानिकांचा असून उद्या पासून कोणीही व्यापारी आला तरी त्याला एक रुपया देखील द्यायचा नाही

ठेकेदार बिलाल किंवा उत्तरप्रदेश / मध्यप्रदेश येथील माणसे येणार आणी हा व्यवसाय करणार असतील आणि आमच्या स्थानीक आदिवासी बांधवाना उघड्यावर टाकणार असेल तर हे तुमचा भाऊ म्हणून मी कदापि शक्य होऊ देणार नाही .
आजपर्यंत आदिवासी बांधवावर खोटे गुन्हे दाखल केलेल्या गुन्ह्यात फिर्यादी अन्वर भाई हा होता यावेळी अन्वर भाई याने मेळाव्यातील स्टेजवर येऊन सर्व आदिवासी बांधवांची माफी मागत गुन्हे मागे घेत असल्याचे जाहीर केले .
यावेळी आ. कांदे यांनी पोलीस प्रशासनास आवाहण केले की बिलाल ठेकेदाराने आमच्या मासेमार बांधवांचे जाळे किंवा ज्या ज्या वस्त जप्त केल्या असतील त्या २ ते ३ दिवसात परत देणे अन्यथा त्या बिलाल ठेकेदाराचे गोडाऊन नेस्तनाबूत केल्या शिवाय राहणार नाही.
या प्रसंगी स्टेजवर शिवसेना पदाधिकारी ‘ महिला आघाडी ‘ आजी माजी पदाधिकारी यांच्यासह गिरणाधरण परिसरातील ५ ते ६ हजार आदिवासी बांधव उपस्थित होते .


अजून बातम्या वाचा..

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

 फलक रेखाटन विशेष दिनांक : ६ जुलै २०२५ – आषाढी एकादशी स्थळ : नूतन माध्यमिक विद्यालय, भाटगाव (ता. चांदवड, जि. नाशिक)

  महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक ओळखीचा अविभाज्य भाग म्हणजे आषाढी एकादशीची वारी —...

read more
“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.