शिंगवे येथे आज नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत गावात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढून नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आदिवासी वस्ती व गावात प्रभात फेरी काढली. या नवभारत साक्षरता कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे सर व माळी सर गायकवाड सर, वाले सर यांनी विद्यार्थ्यांना नवभारत साक्षरता अभियाना संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे,शिंगवे ग्रामपंचायतचे सरपंच श्री आत्माराम खताळ, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख श्री किरण बोरसे तसेच विद्यालयाचे खताळ सर, माळी सर, वाले सर,गायकवाड सर,देवरे सर, शेळके सर, झाल्टे मॅडम, संजय अहिरे, दीपक पाटील, समाधान मढे आदी कर्मचारी उपस्थित होते.
राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंचा दबदबा
पाच सुवर्ण दोन रौप्य व दोन कांस्यपदकासह उत्कृष्ट कामगिरी कृष्णा व्यवहारे व श्रावणी पुरंदरे साहिल...











