शिंगवे येथे आज नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत गावात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सकाळी प्रभात फेरी काढून नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत आदिवासी वस्ती व गावात प्रभात फेरी काढली. या नवभारत साक्षरता कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे सर व माळी सर गायकवाड सर, वाले सर यांनी विद्यार्थ्यांना नवभारत साक्षरता अभियाना संदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र गांगुर्डे,शिंगवे ग्रामपंचायतचे सरपंच श्री आत्माराम खताळ, भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख श्री किरण बोरसे तसेच विद्यालयाचे खताळ सर, माळी सर, वाले सर,गायकवाड सर,देवरे सर, शेळके सर, झाल्टे मॅडम, संजय अहिरे, दीपक पाटील, समाधान मढे आदी कर्मचारी उपस्थित होते.
मनमाड सार्वजनिक वाचनालयात मराठी राजभाषा गौरव दिन तसेच स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या 59 पुण्यतिथी निमित्ताने संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन मराठीभाषे तील प्रसिद्ध लेखक संदीप देशपांडे यांचा गौरव
मनमाड शहराच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणार्या आणि व्रत अखंड वाचक...








